जनशक्ती (वृत्तसेवा)- राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख आणि भाजप नेते नितीन दिनकर व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी पाटपाणी संदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे यांची भेट घेत, हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. नेवासा तालुक्यात कांदा लागवड, ऊस, ज्वारी यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते अब्दुलभैय्या शेख यांची भेट घेऊन त्यांना याबाबत कल्पना दिली होती. नागपूर येथे अधिवेशनास उपस्थित झाल्यावर अब्दुलभैय्या यांनी मुळा धरणातून आवर्तन सोडवून घ्यावे, अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना केली. त्यांनी तात्काळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाटपाणी सोडण्याची विनंती केली. मंत्री विखे पाटील यांनी संबधित अधिकारी सायली पाटील यांच्याशी संपर्क करत लवकरात लवकर नियोजन बैठक घेत पाटपाणी सोडण्याचे आदेश दिले. मंत्री विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढल्याने अब्दुलभैय्या शेख, नितीन दिनकर व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. याप्रसंगी मकरंद राजहंस, अशोकजी मोरे, सतिष कावरे, अभिराज आरगडे, अशपाक शेख आदी उपस्थित होते.
